पोस्ट्स

डॉ.मथुताई सावंत : एक एक चिंतनशील लेखिका

इमेज
डॉ. मथुताई सावंत : एक चिंतनशील लेखिका  -------------------- छाया बेले, नांदेड.  आयुष्यात काही व्यक्ती अशा भेटतात की, त्यांचा व आपला प्रत्यक्ष सहवास किती काळ आहे, हे महत्त्वाचं नसतं. काही क्षणांच्या भेटीतच एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा आपल्या मनावर ठसा उमटून जातो. असंच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे नांदेड येथील ज्येष्ठ साहित्यिक, प्रा. डॉ. मथुताई सावंत. त्यांच्याशी पहिली ओळख ही त्यांच्या कथासंग्रहातून झाली. आपल्या काळातील व आपल्या भागातील स्त्रीलेखिकांचा शोध घेत असताना मथुताईंचा 'तिची वाटच वेगळी ' हा कथासंग्रह हाती आला.  अनेक लेखकांची अनेक पुस्तकं वाचनात आली.  सगळेच काही लक्षात राहत नाहीत; मात्र  'तिची वाटच वेगळी' हा कथासंग्रह अंतःकरणात कुठेतरी साठून राहिला.  याचं कारण असं की, या कथांमधून ताईंनी मराठवाड्यातील स्त्रीजीवनाचं वास्तव एवढ्या तळमळीनं, जीवाच्या जिव्हाळ्यानं मांडलं आहे की ते थेट अंतःकरणाला भिडतं. तेव्हापासून मथूताईंना भेटण्याची आतुरता लागून होती. ती संधी प्रसाद बन साहित्य पुरस्काराच्या निमित्ताने आली. तो क्षण अविस्मरणीय होता. जेवढी सच्चाई ताई...

संघर्षाच्या धगधगत्या वाटेवरील प्रवासाची कहाणी — ‘तीन निर्झर’

इमेज
संघर्षाच्या धगधगत्या वाटेवरील प्रवासाची कहाणी — ‘तीन निर्झर’       दारिद्र्य, जात, स्त्रीत्व हे वागवत जगण्याचा रोजचा संघर्ष या विळख्यात अडकून असतानाही आशेचा धागा पकडून जीवनाला प्रकाशमान करण्याची जिद्द बाळगण्याची कहाणी म्हणजे ‘तीन निर्झर’.     सुभा लोंढे यांचं आत्मचरित्र ‘तीन निर्झर’ वाचत असताना प्रत्येक प्रसंग मनाला अस्वस्थ करतो. त्याचबरोबर ही कहाणी , नाउमेद झालेल्यांना जगण्याची उमेदही देते. परिस्थितीसमोर हार न मानणाऱ्या माणसांची कहाणीच पुस्तक रूपाने लेखिकेने मांडली आहे.     सुभा लोंढे यांचं हे आत्मचरित्र केवळ जीवनातील घटनांची नोंद नाही, तर ती प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उभ्या राहिलेल्या जिद्दीच्या प्रवासाची नोंद आहे. मुलगी शिकली पाहिजे हा विचार समाजमनाच्या पाठीवर उमटण्याच्याही आधीच्या काळात आजी-आजोबांनी आपली नात शिकली पाहिजे हा घेतलेला ध्यास आजच्या सुशिक्षित म्हणवणाऱ्या त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या समाजाच्या संकुचितपणावर चपराक आहे.     ‘तीन निर्झर’ या आत्मचरित्राचं वैशिष्ट्य म्हणजे लेखिकेने स्वतःच्या जीवनाक...

श्रीनिवास मस्के यांची कविता.

इमेज
       बाईचा दस्तऐवज या कविता संग्रहाच्या निमित्ताने लिहिलेला अभिप्राय  श्रीनिवास मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा पोस्ट करीत आहे.         बरडशेवाळा ता.हदगाव या छोट्याशा गावात जन्मलेले कवी श्रीनिवास मस्के हे नव्या पिढीतील महत्वाचे व ग्रामीण कवीता दमदारपणे लिहिणारे कवी आहेत . एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व , सुप्रसिद्ध कवी,  व्याख्याते म्हणून सगळा महाराष्ट्र त्यांना ओळखतो . त्यांच्या मंचीय कविता श्रोत्यांच्या मनावर गारूड करतात . कवी , वक्ते , विद्यार्थीप्रिय आदर्श शिक्षक. अशा अनेक भुमीका पार पाडत समाजासाठी आपलं योगदान देत आहेत . त्याचबरोबर त्यांच्या ठायी एक निखळ माणूसपण वास करते. श्रीनिवास मस्के यांनी आपल्या कवितेतून गावभुईचं समग्र जीवन , तिथलं जगणं , तिथली हिरवळ , उन्हं, पाऊस सगळंच उगवून आणतात . त्याच बरोबर खेड्यातील कष्टकरी बाईचं जगणं जेवढं आत्मियतेने मांडतात. त्यांच्या शब्दात समग्र समष्टीविषयीचा जिव्हाळा दिसून येतो.          तो कासऱ्याचा दोर करतो               ...

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे : मानवमुक्तीचा ध्यास घेतलेले विचारवंत

इमेज
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे : मानवमुक्तीचा ध्यास घेतलेले विचारवंत जग बदल घालूनी घाव  सांगून गेले मला भीमराव ||  असं  सांगत शोषणावर आधारित व्यवस्था बदलून मानवमुक्तीची असं मनी बाळगून असलेले थोर विचारवंत, लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे मातंग समाजात झाला.    महामानवांना जात, धर्म किंवा पंथाच्या चौकटीत बंदिस्त करता येत नाही. त्यांच्या जातीचा उल्लेख केवळ एवढ्यासाठीच आवश्यक ठरतो की, ज्या समाजाचे माणूसपणच वर्णव्यवस्थेने नाकारले होते, त्या समाजातून अण्णाभाऊंसारखा विश्वमानव जन्माला येणं, हे सिद्ध करतं की माणूस हा त्याच्यातील प्रतिभेने,  कर्तृत्ववाने, त्याच्या केलेल्या कार्याने श्रेष्ठ ठरतो.      त्या काळात मातंग समाजाचे जीवन अत्यंत खडतर होते. दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा, उपासमार, रोगराई आणि सामाजिक बहिष्कार याने  वेढलेले होते. तरीही या समाजात प्रामाणिकपणा, धैर्य, श्रमशीलता हा त्यांच्या संस्कारांचा अविभाज्य भाग होता. वीरासारखे जगणे आणि वीरासारखे मरणे त्यांच्या रक्तात ...

युवक : सत्याग्रह, संघर्ष व देशाचे भविष्य

इमेज
युवक : कॉकरोज सत्याग्रह, संघर्ष व देशाचे भविष्य यह देश वीर कॉकरोजो का  अलबेलों का मस्तानों का...!! काही दिवसांपासून जंतर मंतर वरील या लेकरांकडे बघून या ओळी आपोआप मनात घोळत आहेत.  मागील अनेक दिवस चाललेल्या या युवक आंदोलनाने अनेक भ्रम मोडून काढले.  देशातील युवक हेच त्या देशाची खरी शक्ती आहे हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले.         कोणत्याही राष्ट्राची खरी ओळख त्याच्या  नैसर्गिक संपत्तीने, तंत्रज्ञानाने किंवा आर्थिक प्रगतीने ठरत नाही; ती ठरते त्या देशातील युवकांच्या विचारांनी. कारण प्रत्येक पिढी आपल्या काळाचा इतिहास वारशाने स्वीकारते; पण भविष्य ती स्वतःच्या विचारांतून , कृतीतून घडविते. म्हणूनच युवक हा केवळ एका विशिष्ट वयोगटाचा उल्लेख नसून तो परिवर्तनाचा व  नव्या मूल्यांच्या निर्मितीचा जिवंत प्रवाह आहे. इतिहासात जेव्हा जेव्हा समाजाने अन्यायाला नकार दिला, तेव्हा त्या नकारामागे युवक  होता. जेव्हा जुलूमशाहीने माणसाचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला सर्वप्रथम आव्हान देणारे हात तरुणांचेच होते. जेव्हा समा...